बघ तुला उमगतय का प्रेम

मला उमगत नाही प्रेम म्हणजे नक्की काय असतं
तुझं सेम असतं कि माझं सेम असतं

एकतर्फी प्रेम हाेतं
कधी तुला हाेतं
कधी मलाही हाेतं

तुझं Attraction असतं
कि माझं Attraction असतं
हे दाेघांना समजण्याआधीच प्रेम वाटू लागतं

आधी मित्र झालाे एकमेकांच्या सवयीचे झालाे
तु मला आेळखतेस
मी तुला आेळखताे
चालता,बाेलता,भेटता कधी न भेटता
मनातलं सगळच मला सांगतेस
मीही सगळं ऐकून घेताे
तुला समजावण्याचं धाडस करताे..

तुझा एकटेपणा कमी करता करता
मी मात्र एकटा पडताे

एकतर्फी प्रेमाची हीच का ती सुरूवात
म्हणून ही मी बैचेन हाेताे

तुला काय वाटतं माझ्याबद्दल
मला काय वाटतं तुझ्याबद्दल

हेच रात्रभर चाचपडत बसताे
भल्या सकाळी आवरून सावरून बाहेर पडताे

तुला भेटून सगळं सागावं का?
हा प्रश्न घेवून हिंडत फिरताे

धाडस हाेत नाही म्हणून
मदयाचा एक घाेट घेताे
एक – दाेन घाेट पाेटात उतरल्यावर
सिंहासारखा डरकाळी फाेडताे

आता..
आता तुझा नंबर डायरीमधून काढताे
तुला फाेन करायला वेडयासारखा वागू पाहताे
एकदा रिंग वाजून कट करताे

सिंह झालेलाे मी एका रिंगमध्येच
पळताभुई थाेडी हाेताे

मग तिचा फाेन येताे
कट का केलास म्हणून विचारल्यावर
मी ही खाेटं बाेलू पाहताे

खाेटं मी ही बाेलताे
खाेटं ती ही बाेलते

दोघांना ही माहित असून
आधी तू आधी मी करत करत
काहीच नाही असं म्हणून टाळा टाळ करू पाहताे

आता मनातले बाेल बाेलून टाक
रंगमंचाची भूमिका किती वेळ रंगवणार
आता भूमिकेचा पडदा पाडून टाक
चेहऱ्यावरचा रंग पुसून टाक
मूळ भूमिकेत येवून प्रेमाची कबुली माग

तिचा हाेकार येताच आयुष्याला आकार देवून टाक
बघ आता तुला उमगतय का प्रेम म्हणजे नक्की काय…
.
.

  • प्रमा
    २७/०५/२०२०

चला वारीला

।। चला वारीला ।।

भेटींलागी जीवा लागलीसे आस
रात्रींदिवस वाट तुझी

खरतर हा अखंड साेहळा विठ्ठला
तुझ्या भक्तीची,पंढरपुराची
वाट पाहताे आहे.
माणसांतला देव शाेधण्याची वेळ जेव्हा
येते तेव्हा आपसुकच पावलं
वारीच्या दिशेने वळायला लागतात.
“दिवाळीच्या वेळी लेक जशी माहेराहून आईबापांचे बाेलावणे येण्याची वाट पाहते
अगदी तशीच मी
पंढरपुराची वाट पाहताे
आहे.
घरदार साेडून मैलाेमैली दिवसभर चालत,पळत जावं
ऊन,वारा,पाऊस याची कुठलीच तमा न बाळगता माझ्या मनाला तुझ्या भेटीची
आस लागावी आणि हा वैष्णवांचा मेळा,
अनवाणी पायाने,तहानभूक हरवून,भक्तीत तल्लीन
हाेवून विठूनामाचा
जयघाेष करत पालखीसंगे कुच करावी असा हा वारीचा पालखी साेहळा
काही वेगळाच आनंद देवून जाताे.
आणि आपसुकच उत्तर
सापडावं “वारी का करावी” याचं.
तर उत्तर मिळत “सुख”
आणि ते स्वत: वारी केल्याशिवाय कळतही
नाही आणि मिळतही नाही..
म्हणून संत तुकाराम महाराज
म्हणतात देवा मला तुझ्या भेटीची फार भूक लागली आहे
तरी धावत ये
दर्शन देवून माझ्या
भेटीची भूक नाहीशी कर..
– प्रमा

उगाचच

अगं ऐक ना..थाेड बाेलावं म्हणताेय

नात्याविषयी नाही पण आपण ठरवलेल्या स्वप्नविषयी.
तू विसरली असलीस तरी तुला आठवण करून देताेय.आठवतय का काही..तू विसरली नाहीयेस विसरण्याचं साेंग करतीयेस..
अग ऐक ना ..चल हाेवू घातलेल्या नात्याविषयी बाेलू
” कारण काही गाेष्टी अपूर्ण राहिल्या आहेत.”
नातं दाेघाचं असलं तरी ते कितपत खाेटं आणि खरं आहे हे दाेघांव्यतिरिक्त कुणालाच माहित नाही.
मग नात्यामध्ये अपेक्षाचा,स्वप्नाचा,भावनांचा,साेबतीचा अट्टाहास आपण का धरायचा..
सुकलेल्या पानाला कधीतरी गळून पडायचं आहे हे माहित असताना देखील घट्ट धरून राहण्याची आशा का बाळगावी.तसच काहीसा आपल्या नात्याचं झालंय.हेच सांगायचं आहे तुला…
आहे मी साेबत एक वाटसरू हाेवून पण कधीतरी..नेहमीसारखा नाही..कारण सुरळित चालत असताना विघ्न कमी येत नाही.आणि या विघ्नांना ताेंड देण्याची ताकद आता माझ्यात नाही..
साध्या सरळ स्वभावाचा मी पण आता टिकेच्या नजरेने पाहतात सारे.अशा वेळी वाटतं साेबत असावं कुणीतरी..
पण ऐक ना…
टिकेचं जावूच देत पण आता गाठ साेडूयात काही गाठी घट्ट बसल्यात रूतून पण ज्या निघतील त्या काढू..आणि अपेक्षाच्या आेझ्याखाली दबलेल्या मनाला मुक्ती देवू.
असं म्हणतात हरवलेली माणसं पुन्हा भेटतात.घेवूयात शाेध आणि आस ठेवून आयुष्याची नवी सुरूवात करू.बघू तुला जमतंय का ? आणि मला सावरता येतंय का ?

अगं ऐक ना..थांबताे आता

– प्रमा

नात्यास नाव आपुल्या

कधी-कधी असं वाटतं कि ताे जुना काळ बरा हाेता.माणसांना माणसासाठी जिव्हाळा,आपुलकी हाेती,पण आता कुठे ती लाेप पावत चालली आहे.
संस्कृती बदलली,र्त्रृतू बदलावे तशी माणसं ही बदलली आणि अर्थातच नाती ही…
मध्यरात्री ब्रम्हकमळ उमलावं आणि सकाळी ते ताेडावं असंच काहीसं नात्याबद्दल मला वाटतं.किती सहजपणे आपण नातं जाेडताे आणि काही खटकलं कि तितक्याच सहजतेने ते ताेडताे ही.ना जाेडताना विचार करताे कि कुठपर्यंत ते टिकेल आणि नं ताेडताना हा विचार करताे कि कितीकाळ अबाेला धरेल..
मग नेमकं मला कुणी सांगेल का नातं म्हणजे काय ?

माझ्यालेखी नातं हया शब्दातच त्याचं उत्तर दडलय न तुटणारं म्हणजे नातं..
नाती ही कैक प्रकारची असतात.मातृत्वाचं,बहिण-भावाचं,मैत्रीचं,प्रेमाचं..
तुझं-माझं म्हणता म्हणता आपलेपणाचा तयार हाेतं ते नातं,मन जुळली की नातं तयार हाेतं,गुण जुळले कि नातं फुलू लागतं,सुर जुळले कि नातं गुणगुणतं
शब्द जुळले कि कवितेचं नातं बनतं,निसर्गाशी एकरूप झालं कि सहवासाचं नातं बनतं..
नातं फक्त माणसांशीच नाही तर सजींवापासून ते निर्जिवापर्यंत जे – जे हवं हवंस वाटतं तिथे नातं निर्माण हाेतं..
नातं हे सहज असावं,समजून घेणारं,समजून सांगणारं,आधार देणारं आणि निस्वार्थी नसून पाठीशी खंबीरपणे उभं राहणारं निखळ असं नातं असावं..
नात्याला नावं फार,नात्याला उपमा ही फार..
मग आपल्या नात्याला नाव काय ?
आयुष्याचा सुंदर प्रवास,असावा फक्त संवाद,प्रेम,जिव्हाळा,ना देणे – ना घेणे,शक्य हाेईल तितका वेळ स्वत:ला आणि नात्यारूपी गुंफलेल्या माळेला देणे..हे नात्यास नाव आपुल्या..

– प्रमा

पाऊस

आठवताे पहिला पाऊस

आठवताे FC आणि DECCAN चा अवतार

आठवताे ताे चहा आणि गप्पांचा बहार

आठवते ती संगताची सुरेल मैफिल

याच आठवणींनी गजबजताे तुझ्या माझ्या मनातील गाव

– प्रमा

मीच मला शाेधते..!

रात्रीची मीच मला शाेधत असते
सकाळी उठताच माझ्यातली मी जागी हाेते…

प्रश्न असतात खूप सारे
पण उत्तरे मात्र शून्य

डाेळे बंद करता दिसता रूप अनेक
सकाळी मात्र उठताच माझेच प्रतिबिंब माझ्यात दिसते

काय करू सुचत नाही
आणि बाेलकी चेहरे सुचवू देत नाही

रात्रीची मीच मला शाेधत असते
सकाळी उठताच माझ्यातली मी जागी हाेते…

– प्रमा